छत्रपती संभाजीनगर : अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या घरात लग्नकार्य पाहायला मिळत असून, आज त्यांच्या मुलाचे लग्न आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील एका लॉनवर सायंकाळी 6 वाजता हा विवाह सोह्ळा पार पडत आहे. अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव अमेर सत्तार यांचा हा विवाह सोहळा होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह बडे नेत्यांची हजेरी पाहायला मिळणार आहे.
अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव अमेर सत्तार यांचा विवाह नाशिकच्या येवला येथील अहमद शेख यांची कन्या हुमा नाज शेख यांच्यासोबत होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवरील आयकॉन लॉनवर हा विवाह सोहळा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाहाची शाही तयारी करण्यात आली आहे. यावेळी तब्बल 25000 लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
Related News
इस्रायल-हमास युद्धात भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू, महाराष्ट्राशी होता खास संबंध
संजय राऊतांचा बळीचा बकरा पक्षश्रेष्ठींनीच केलाय; निलम गोऱ्हेंची नाव न घेता ठाकरेंवर सडकून टीका
धर्माच्या नावानं मतं मागायची? ठाकरेंच्या पत्राला निवडणूक आयोगाचं उत्तर नाही, पुन्हा स्मरणपत्र
ढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?
नवाब मलिक कोणाचे? फडणवीसांच्या पत्रानंतर सुनिल तटकरेंची सूचक प्रतिक्रिया
मलिकांवरून फडणवीसांचे अजित पवारांना पत्र; वडेट्टीवार म्हणतात, भाजप हा धूर्त पक्ष असून…
अजितदादांना सत्तेत घेताना देश मोठा वाटला नाही का?, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना बोचरा सवाल
दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी म्हणजे शिळ्या कढीला ऊत, अनिल परबांचा थेट वार
देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये, तरीही मंत्रीपद कायम; मलीकांच्या समोरच फडणवीस थेट बोलले
VIDEO: ‘गंभीरने काय केलंय हे लवकरच कळेल’; मैदानातल्या वादानंतर श्रीसंतने सांगितलं धक्कादायक सत्य
यांची असणार उपस्थिती?
अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, शुंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आज न येणारे पाहुणे रिसेप्शनला येतील…
दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी 25000 लोकांच्या जेवणाची सोय केली असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलय. आपल्या घरातील हा शेवटचा विवाह सोहळा असल्याने साधारण, पण चांगल्या पद्धतीने आपण करत आहोत. मात्र, यावर विरोधकांनीं शिव्या (टीका) दिल्या तरीही आपण आहेर म्हणून स्वीकारू असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. याशिवाय आज या विवाह सोहळ्याला उपस्थित न राहू शकलेल्या मंत्री आणि नेत्यांचा वलीमा अर्थात रिसेप्शनचा 21 तारखेचा सिल्लोड येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. या, रिसेप्शनला उपमुख्यमंत्री अजीत पवार, खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती राहणार असल्याचे देखील सत्तार यांनी म्हटले आहे.