अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
- सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये वाढली गर्दी
वातावरणासह पाण्यात झालेला बदल तसेच डोळ्यांचा संसर्ग या कारणामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये दरदिवशी दिड हजारांवर रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
Related News
घोडेस्वारीत 41 वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्ण: मुलीला जर्मनीत प्रशिक्षण देण्यासाठी वडिलांनी घर विकले, खेळाडूंची प्रेरणादायी कथा
दुसऱ्या विवाहाचे फोटो पतीने स्टेटसला ठेवल्याने आत्महत्या: पतीने दुसरा विवाह केल्यामुळे डाॅक्टर पत्नीने घेतला गळफास
नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश डीजेवाजवणाऱ्या २२ गणेश मंडळांवर गुन्हे: डेसिबलची अट मोडणाऱ्यांवर पोलिस कारवाई
मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्हे, तर कायदेशीर लढ्याची गरज: पुण्यातील मराठा आरक्षणाबाबत तज्ज्ञांच्या बैठकीतील सूर
संत दामाजी कारखान्याची वार्षिक सभा: २०० कोटी रुपयांचा बोजा असताना आम्ही काटकसरीने चालवला- चेअरमन शिवानंद पाटील
सेलिब्रिटींचा गणेश: गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे निखळ आनंद- पं. विजय घाटे, तबलावादक आणि गुरू
प्रेमविवाह करायचाय, मग आई- वडिलांची परवानगी आवश्यक: गोंदियातील नानव्हा ग्रामपंचायतीचा ठराव, राइट टू लव्ह संघटनेचा आक्षेप
आलमट्टीच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली हेबाल नाला पाहणी: आलमट्टी धरणातील पाणी उपयोगात आणण्याचे प्रयत्न
19वी आशियाई स्पर्धा हांगझोऊ: आशियाईच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरा व आधुनिकतेचा मेळ, स्पर्धेत ज्योत पेटवण्यासाठी होलोग्रामचा वापर
अजेय इंदुरात दुसरा वनडे: आज जिंकलो तर मालिका विजय आपलाच; सूर्या व चौथ्या क्रमांकाचा गुंता सुटला; अश्विन-श्रेयसला करावे लागेल सिद्ध
रोव्हरच्या माध्यमातून ७ महिन्यांत १५ हजार हेक्टर क्षेत्राची मोजणी: भूमी अभिलेख विभागाकडून ४० रोव्हर यंत्राद्वारे जमिनींचे ५७०० प्रकरणे निकाली
विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी: प्रथमच तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1, ताज्या क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकले
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळला आहे. सद्या पावसाने उसंत घेतली आहे. मात्र सततच्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे सोबतच पाणीसुध्दा बदलेले आहे. यामुळे बदललेल्या वातावरणाचा मानवी शरीरावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील बहुतांश घरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळत आहे. इर्विनमध्ये (जिल्हा सामान्य रुग्णालय) दरदिवशी दोनशेपेक्षा अधिक रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येत आहेत. याचवेळी खासगी डॉक्टरांकडे ४०० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. तर महानगर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दरदिवशी सर्वाधिक ९०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.
पावसाळ्यात व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढतात. सर्दी, खोकला ताप आदींचे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ उपचारासाठी येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. – डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय पिण्याचे पाणी फार दिवस साठवून ठेवू नये, कुलरमध्ये तसेच घराच्या आजूबाजूला पाणी साचू नये अशी व्यवस्था करावी, कुंड्यांच्या खाली असलेल्या प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका, कुलरमध्ये पाणी राहू देऊ नका,घराजवळ, परसबागेत डबके साचणार नाही, हे आवर्जून बघा, हौद, पाण्याची टाकी उघडी ठेऊ नका. ^महानगर पालिकेच्या क्षेत्रात १८ शहरी आरोग्य केन्द्र आहेत. सद्यःस्थितीत सरासरी प्रतिदिवस ९०० रुग्ण या केंद्रांमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामध्ये सर्दी, ताप, खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ दिसत आहेत. सध्यातरी डेंग्यू, मलेरिया अशा आजारांचे रुग्ण आढळले नाहीत. जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत शहरात डेंग्यूच्या २८ रुग्णांची नोंद आहे. – डॉ. विशाल काळे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, मनपा.