Asia Cup 2023 : टीम इंडिया सध्या श्रीलंकेमध्ये असून एशिया कपच्या सामन्यांमध्ये व्यस्त आहे. 2 सप्टेंबर रोजी एशिया कपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान ( India – Pakistan ) यांच्यात सामना रंगला होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यावेळी दोन्ही टीम्सना एक-एक पॉईंट वाटून देण्यात आला. दरम्यान आता ग्रुप ए मधून पाकिस्तान टीमने सुपर 4 साठी क्विलिफाय केलं आहे. मात्र यामध्ये एक समीकरण असंही आहे, ज्यामुळे टीम इंडिया सुपर 4 साठी क्वालिफाय करू शकणार नाही.
पाकिस्तानविरूद्धचा सामना झाला रद्द
पाकिस्तान ( India – Pakistan ) विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने 48.5 ओव्हरमध्ये 266 रन्स केले. मुसळधार पावसामुळे या सामन्याचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर सामनाधिकारी यांनी सामना रद्द केला असल्याचं घोषित केलं.
जर टीम इंडिया नेपाळशी हरली तर…
भारत आणि नेपाळ यांच्यात 4 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना ‘करो या मरो’च्या स्थितीत अडकला आहे. दोन्ही ग्रुपचा सुपर 4 चा प्रवास उद्याच्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. जर टीम इंडिया नेपाळविरूद्धचा सामना हरली तर टीम थेट आशिया कपमधून बाहेर पडू शकते. जर हा सामना टीम इंडिया जिंकली तर थेट आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये प्रवेश मिळू शकतो.
Related News
डेव्हिड वॉर्नर अचानक उजव्या हाताने का खेळू लागला? ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा, म्हणाला ‘त्याला फार…’
प्रॅक्टिस मॅचमध्ये कर्नाटककडून वर्ल्ड कप टीम नेदरलँडचा पराभव: डच संघाचा बंगळुरूत कॅम्प; सामरथ आणि पडिक्कलची अर्धशतकी खेळी
भारत-ऑस्ट्रेलिया हे सर्वात मजबूत प्रतिस्पर्धी: कसा बदलला टीम इंडियाचा ऍटिट्यूड… 1993 नंतर ऑस्ट्रेलियाला दाखवली आक्रमकता आणि जिंकला 2011
तिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI… हे खेळाडू बाहेर
KL Rahul : कधी कधी चुका…; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल
बाऊंड्रीलाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा ‘हा’ माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?
आरक्षण लागू होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी 33 टक्के उमेदवारी महिलांना द्यावी का? सर्वेक्षणात लोक
AUS vs IND : आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video
महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचा फायदा कोणाला? सर्वेक्षणातील आकडा समोर
6,6,6,6… मैदानात उतरताच सूर्याची फोडाफोडी! भरदिवसा ग्रीनला दाखवल्या चांदण्या; पाहा Video
IND vs AUS : शुभमनच्या खणखणीत सिक्स पाहून श्रेयस अय्यरही झाला शॉक, पाहा Video
सायन्स ऑफ क्रिकेट – रनिंग बिटवीन द विकेट्स: कोहलीने उसेन बोल्टच्या वेगाने 22 यार्डचे अंतर कापले, त्याच्या बायोमेकॅनिक्समध्ये आहे काहीतरी खास
आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियामध्ये बदल होणार
नेपाळविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला तर टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यावेळी टीम इंडियाच्या कर्णधारपदी दुसऱ्या खेळाडूची वर्णी लागू शकते. टीमची कमान रोहित शर्माकडून हिरावून घेतली जाऊ शकते.
नेपाळविरूद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.