Asia Cup 2023: एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) 2 सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना रंगला होता. या पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्यात आला. भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रद्द झाल्याने चाहत्यांचा मात्र हिरमोड झाल्याचं दिसून आलं. मात्र अशातच चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीये. एशिया कपच्या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत.
‘या’ दिवशी पुन्हा भिडणार भारत पाकिस्तान
टीम इंडियाने सोमवारी आशिया कपमध्ये नेपाळचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सुपर-4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता सुपर-4 टप्प्यातील भारताचा पहिला सामना रविवारी 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे.
2 सप्टेंबर रोजी पल्लेकलमध्ये झालेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी केली होती. मात्र पाकिस्तानच्या फलंदाजीपूर्वी पावसाने पुन्हा एकदा खेळ करत सामना रद्द केला.
Related News
गणेश विसर्जनावेळी झारखंडच्या टोळीपासून सावधान! 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ‘रिंग रोड’ तयार, कसा असेल? जाणून घ्या
डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना
मनोज जरांगेंच्या मागणीत आणखी एक विघ्न; 65 लाख कागदपत्रांच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड
डेव्हिड वॉर्नर अचानक उजव्या हाताने का खेळू लागला? ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा, म्हणाला ‘त्याला फार…’
प्रॅक्टिस मॅचमध्ये कर्नाटककडून वर्ल्ड कप टीम नेदरलँडचा पराभव: डच संघाचा बंगळुरूत कॅम्प; सामरथ आणि पडिक्कलची अर्धशतकी खेळी
पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळत स्वतःलाही संपवले
तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
भारत-ऑस्ट्रेलिया हे सर्वात मजबूत प्रतिस्पर्धी: कसा बदलला टीम इंडियाचा ऍटिट्यूड… 1993 नंतर ऑस्ट्रेलियाला दाखवली आक्रमकता आणि जिंकला 2011
तिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI… हे खेळाडू बाहेर
विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेची सीमारेषा ओलांडली: आता थेट कृती अन् निर्णय अपेक्षित, ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांची भूमिका
सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलसंदर्भात वर्ल्डकपआधीच भारतीय संघाचा मोठा निर्णय
एशिया कपमध्ये भारताने स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव केला. त्यामुळे 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार हे निश्चित झालं.
नेपाळने आसिफ शेखचं अर्धशतक आणि सोमपाल कामीच्या आकर्षक खेळीच्या बळावर नेपाळने सोमवारी भारताविरुद्ध 48.2 ओव्हरमध्ये 230 रन्सचा स्कोर केला. नेपाळने दिलेल्या 231 रन्सचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग आले. यावेळी रोहित आणि शुभमनने टीम इंडियाची एकंही विकेट न गमावता आव्हान पूर्ण केलं. रोहितने 74 धावा केल्या तर शुभमन गिलने 67 धावांची खेळी केली.
पुढचे सामने होणार कोलंबोमध्ये
एशिया कप हा हायब्रिड मॉडलवर खेळवण्यात येतोय. यावेळी श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सामने खेळवले जात असून सुपर-4 आणि अंतिम सामन्याचा मान श्रीलंकेला देण्यात आला आहे. कोलंबात 9, 10, 12, 14 आणि 15 सप्टेंबरला आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये सामने खेळवले जाणार आहेत. पण कोलंबोत सध्या मुसळधार पाऊस पडतोय. दुसरीकडे कँडीतही पावसाने हजेरी लावली आहे. 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान कँडीतल्या पल्लेकल स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला.