Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहाला घेऊन, जा धाब्यावर घेऊन जा असा सल्ला दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेल्या या अजब सल्ल्याची ऑडिओ क्लिप (Audio Clip) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अहमदनगर येथे बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये पत्रकारांना परवानगी नसली तरी बावनकुळे यांच्या भाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी नगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय 2024 विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांच्यासह नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती. त्यांनी वयक्तिक रित्या अजितदादांना...
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे यांनी नवाब मलिकांना (Nawab Malik) जो पर्यंत आरोप खोटे असल्याचं सिद्ध होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सामील न करुन घेण्याची विनंती अजित पवारांना (Ajit Pawar) पत्राद्वारे...
मुंबई : नवाब मलिकांना (Nawab Malik) महायुती सरकारमध्ये समाविष्ट न करुन घेण्यासंदर्भात पत्र लिहिले. यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली. हा कोणत्याही प्रकारच दवाब नसून ही भाजप (BJP) पक्षाची भूमिका असल्याचं...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
“2024 ची लोकसभा निवडणूक होऊपर्यंत एकही बातमी आपल्या विरोधात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या या अभियानाच्या सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण ज्या बुथवर काम करतो, तेथील सर्व पत्रकारांची माहिती मिळवा. त्या भागातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, स्वत:चे पोर्टल चालविणारे पत्रकार हेही पहावेत. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. त्यात सगळ्या मीडियाचे येतील असे पहावे. त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यालया बोलवा. त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे काय करायचे ते समजलेच असेल. त्यात काही कमी जास्त झाले तर मदतीला खासदार विखे पाटील आहेतच,” असे बानकुळे यांनी म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरच्या दौऱ्यावर नकारात्मक बातम्या येऊ नयेत म्हणून पत्रकारांना चहा पाजा पार्टी द्या असे आवाहन केले होते. याबाबत खुलासा करत असताना नाशिकमध्ये बावनकुळे यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं स्पष्ट केलं. पत्रकार जनतेमध्ये आपल्या कामाची पब्लिसिटी करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी सुसंवाद ठेवा आल्यास चहा पाजा असे म्हटले होते. मात्र त्याचा विपर्यास करून बातमी छापण्यात आल्याचा खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
सुप्रिया सुळेंची टीका
“विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी,” अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे.
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती. त्यांनी वयक्तिक रित्या अजितदादांना...
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे यांनी नवाब मलिकांना (Nawab Malik) जो पर्यंत आरोप खोटे असल्याचं सिद्ध होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सामील न करुन घेण्याची विनंती अजित पवारांना (Ajit Pawar) पत्राद्वारे...
मुंबई : नवाब मलिकांना (Nawab Malik) महायुती सरकारमध्ये समाविष्ट न करुन घेण्यासंदर्भात पत्र लिहिले. यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली. हा कोणत्याही प्रकारच दवाब नसून ही भाजप (BJP) पक्षाची भूमिका असल्याचं...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....