बीड/ जालना/ मुंबई20 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
माजलगाव | ‘आडमुठी भूमिका घेऊन चालणार नाही. पोरखेळ झालाय नुसता. सरकारला मुदत देणारा महाहुशार माणूस. कधी ग्रा.पं. निवडणूक लढवली का?…’ मनोज जरांगे पाटलांविषयी असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आ. प्रकाश सोळंके यांचा बंगला मराठा आंदोलकांनी सोमवारी सकाळी पेटवला.
- ज्यांच्याकडे पुरावे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकार तयार; पण निर्णय जरांगेंना अमान्य
- निर्णय न झाल्याने संयम सुटला; आ. क्षीरसागरांचा बंगलाही पेटवला
- जरांगेंविषयी वादग्रस्त वक्तव्य; माजलगावात आ. सोळंकेंचे घर जाळले
- खासदार, दोन आमदारांचे राजीनामेबीडला इंटरनेट बंद, धाराशिवला कर्फ्यू
- आ. प्रशांत बंब यांचे अॉफिसही फोडले
- संभाजीनगरमध्ये आज सिटी बस बंदजरांगे पाटलांकडून शांततेचे आवाहन
Related News
8 वर्षांपासून कामे सुरू असलेल्या नाशिकरोडच्या नाट्यगृहाचे अखेर 26 जानेवारीला: महसूल आयुक्तांच्या सूचना; मेनगेट ते आयुक्तालय रस्ताही होणार खुला
मराठा आरक्षणासाठी कायदापारित करा; 24 पर्यंत मुदत: हिंगोली येथील सभेत जरांगे यांचा सरकारवर हल्लाबोल
हिंदूविरोधी का बोलता? म्हणत विश्वंभर चौधरींना धक्काबुकी: भाजप-संघ पदाधिकाऱ्यांचा सिन्नर वाचनालय सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात गोंधळ
बुद्धिबळ खेळातील मोठे खेळाडू: वैशाली अन् प्रज्ञानंद पहिले ग्रँडमास्टर बहीण-भाऊ; वैशालीचा देशातील तिसरी महिला ग्रँडमास्टर म्हणून गौरवही
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह: निवडणुकीच्या वर्षात पं. मिश्रांच्या कथा 40%, तर धीरेंद्र शास्त्रींच्या 125% वाढणार
‘रक्तदान चळवळीची उत्तम संस्कृती’: स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिराला प्रतिसाद
आजपासून शहरात पेट्रोल ७९ पैसे, तर डिझेल २.२७ रुपयांनी स्वस्त: १२ वर्षांपूर्वी लादलेला कर रद्द, सकाळी ६ वाजेपासून नवे दर होणार लागू
19 लाखपैकी 4 हजार रक्त पिशव्या एचआयव्हीबाधित: गतवर्षीच्या आकडेवारीतून माहिती, यंदा उपलब्ध नाही
अवकाळी पावसाचे संकट: तीन दिवसांत 3.93 लाख हेक्टर पिके नष्ट; 22 जिल्ह्यांतील शेतकरी उद्ध्वस्त
उद्धव ठाकरे यांना तर गटनेता निवडीचे अधिकारच नव्हते: विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदेसेनेच्या वकिलांचा दावा
रौप्यमहोत्सव: ‘भानुदास-एकनाथ’च्या गजरात पैठण येथे 450 वर्षांनंतर श्री संत एकनाथ महाराजांच्या हस्ताक्षरातील एकनाथी भागवत गीतेची हत्तीवरून मिरवणूक
नगर, नाशिकचे पाणी आज पोहोचणार जायकवाडीत: जायकवाडीचे पथक मुळा धरणावर तळ ठोकून
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागले. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके व बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंगले आंदोलकांनी जाळले. इतर राजकीय पक्षांची कार्यालयेही पेटवली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. धाराशिव जिल्ह्यातही संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान, उपोषणाच्या सहाव्या दिवशी जरांगेंची प्रकृती बिघडली होती. उभे राहताच ते स्टेजवर कोसळले. तरीही ते प्रतिक्रिया देत होते. ‘शांततेत आंदोलने करा. उद्या कुठे जाळपोळ झाल्याचे कळाले तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल,’ असा इशाराही त्यांनी आंदोलकांना दिला.
कुठे काय घडले? 2 राजीनामे : गेवराईचे भाजप आ. लक्ष्मण पवार,