- Marathi News
- Sports
- There Are Numerous Football Fans In The Country, FIFA World Cup Qualifiers Are Also Held; But For The Last 10 Years, The National Competition Has Not Been Organized
एकनाथ पाठक | नवी दिल्ली17 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
- भारतात पात्रतेच्या दुसऱ्या फेरीतील सामने नोव्हेंबरमध्ये भुवनेश्वर व गुवाहाटी येथे होणार आहेत
फिफा विश्वचषकाचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय फुटबॉल संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीचे सामने भुवनेश्वर आणि गुवाहाटी येथे होणार आहेत. या आशियाई पात्रता स्पर्धेत भारत अ गटात कतार आणि कुवेतसह अन्य एका संघासह खेळणार आहे. हा संघ अफगाणिस्तान किंवा मंगोलिया असू शकतो. हे क्वालिफायर दुसऱ्या फेरीचे सामने १६ व २१ नोव्हेंबर रोजी होतील. हा सामना जिंकून भारतीय संघ विश्वचषकात पोहोचण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल. दुसरीकडे, फेडरेशनने स्टार खेळाडू बनवण्याची आपली योजना थांबवली. युवकांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला महासंघाने लाल कार्ड दाखवले. त्यामुळे देशातील १४, १७, १९ व २१ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन पूर्णपणे ठप्प झाले आहे.
Related News
आमची संस्कृती दिवे लावण्याची, दिवे बंद करण्याची नाही: राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली टीका
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी जालन्याच्या तिघांविरोधात गुन्हा: पोलिस भरती घोटाळ्यातील रॅकेटचाच हात असल्याचे उघड
घोडेस्वारीत 41 वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्ण: मुलीला जर्मनीत प्रशिक्षण देण्यासाठी वडिलांनी घर विकले, खेळाडूंची प्रेरणादायी कथा
दुसऱ्या विवाहाचे फोटो पतीने स्टेटसला ठेवल्याने आत्महत्या: पतीने दुसरा विवाह केल्यामुळे डाॅक्टर पत्नीने घेतला गळफास
नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश डीजेवाजवणाऱ्या २२ गणेश मंडळांवर गुन्हे: डेसिबलची अट मोडणाऱ्यांवर पोलिस कारवाई
मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्हे, तर कायदेशीर लढ्याची गरज: पुण्यातील मराठा आरक्षणाबाबत तज्ज्ञांच्या बैठकीतील सूर
संत दामाजी कारखान्याची वार्षिक सभा: २०० कोटी रुपयांचा बोजा असताना आम्ही काटकसरीने चालवला- चेअरमन शिवानंद पाटील
सेलिब्रिटींचा गणेश: गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे निखळ आनंद- पं. विजय घाटे, तबलावादक आणि गुरू
प्रेमविवाह करायचाय, मग आई- वडिलांची परवानगी आवश्यक: गोंदियातील नानव्हा ग्रामपंचायतीचा ठराव, राइट टू लव्ह संघटनेचा आक्षेप
आलमट्टीच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली हेबाल नाला पाहणी: आलमट्टी धरणातील पाणी उपयोगात आणण्याचे प्रयत्न
19वी आशियाई स्पर्धा हांगझोऊ: आशियाईच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरा व आधुनिकतेचा मेळ, स्पर्धेत ज्योत पेटवण्यासाठी होलोग्रामचा वापर
अजेय इंदुरात दुसरा वनडे: आज जिंकलो तर मालिका विजय आपलाच; सूर्या व चौथ्या क्रमांकाचा गुंता सुटला; अश्विन-श्रेयसला करावे लागेल सिद्ध
फेडरेशन फक्त ८ क्लबवर अवलंबून
देशभरात आठ फुटबॉल क्लब आहेत. आयएसएलसारख्या लीगमधून तो तरुण खेळाडूंना तयार करत आहे. हे क्लब आय-लीग आणि परदेशी लीगमध्येही सामील होतात. स्पर्धा आयोजित करून व लीगमध्ये खेळून फुटबॉलपटू सतत चांगली कामगिरी करत आहेत. या लीगमधील क्लब फुटबॉलपटू भारताच्या राष्ट्रीय संघात निवडले जात आहेत. फेडरेशन खेळाडूंच्या तयारीसाठी आणि निवडीसाठी चाचणीसारखी स्पर्धा घेत नाही. मात्र गेल्या १० वर्षांपासून अशा स्पर्धांचे आयोजन थांबले आहे.
शालेय खेळ महासंघाच्या वादाचाही वाईट परिणाम
स्कूल गेम्स फेडरेशनमध्ये सध्या नेतृत्वाबाबत वाद सुरू आहे. त्यामुळे शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला ब्रेक लागला आहे. प्रशिक्षकांची संख्या वाढवण्याच्या बाबतीत फेडरेशनने गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले. देशात दर्जेदार प्रशिक्षक नाहीत. असे काही प्रशिक्षक आहेत जे कधीही फुटबॉल खेळले नाहीत प केवळ चाचणीसाठी अर्ज करून प्रशिक्षक बनले. विश्वचषकानंतर स्टेडियमचेही अद्ययावतीकरण झालेले नाही.