Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं. आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे. अशातच सरकारने जरांगे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. अशातच मनोज जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव फेटाळलाय. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, फक्त त्यांनाच नव्हे तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, अशीच जरांगेंची मागणी आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले Manoj Jarange Patil ?
जाळफोळीला माझं समर्थन नाही. हिंसाचार थांबवला नाही तर मला नाईलाजाने निर्णय घ्यावा लागेल. बहुतेक मला असं वाटतंय की हिंसाचार करणारे सत्ताधारी असतील. त्यांच्यात हाताने जाळून घेतली अन् मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावतील, अशी शंका मला वाटलीच होती. बऱ्याचदा आंदोलन चिघळण्याचं काम केलं जातं. मात्र, आरक्षण मिळेपर्यंत सर्वांनी शांततेत आंदोलन करावं,
हिंसाचाराचा हा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांचा असणार, हे मला शंभर टक्के माहिती होतं. सर्वांना शांतता पाळावी, माझी ही सर्वांनाच विनंती आहे. तुमचा लेक म्हणून, तुमचा भाऊ म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, सर्वांनी शांततेत आंदोलन करावं, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पाणी पिण्याचं आव्हान केलं आहे. त्यांनी मला पत्र देखील पाठवलंय. त्यामुळे मी आता ग्लासभर पाणी पितोय. माझी विनंती आहे की, हिंसाचार बंद करा, हिंसाचार करणारे आपले नाहीत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Related News
शिवसेना आमदार अपात्रता बाबत मोठी अपडेट! आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी काय संकेत दिले?
शरद पवार, भाजप की आणखी कोणी, ‘या’ तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?
आमदार सोळंकेंच्या घरावरील हल्ल्याबाबत मोठी अपडेट; पोलिसांकडून मोठा खुलासा
मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना…; पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट, अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार चर्चा
सरकारला मोजत नाही, गिणत सुद्धा नाही अन् मरायलाही भीत नाही; मनोज जरांगे थेटच बोलले
मराठ्यांनो मुंबईला जाण्यासाठी तयार रहा, अखेर मनोज जरांगे बोललेच; सरकारची अडचण वाढणार
मलिक अल्पसंख्यांक म्हणून ही भूमिका घेतली का? सुषमा अंधारेंचा सवाल
संजय राऊतांचा बळीचा बकरा पक्षश्रेष्ठींनीच केलाय; निलम गोऱ्हेंची नाव न घेता ठाकरेंवर सडकून टीका
धर्माच्या नावानं मतं मागायची? ठाकरेंच्या पत्राला निवडणूक आयोगाचं उत्तर नाही, पुन्हा स्मरणपत्र
Blog : नवाब मलिकांवरुन महायुतीत महाभारत?
हल्ला फक्त मलिक यांच्यावर बाकीचे यांच्या मांडीवर! संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
दरम्यान, मराठा आरक्षणाला समर्थन देत भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर माजलगावचे आमदार प्रकाश सोलंकी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आलीये. तसेच राष्ट्रवादीचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भूजबळ यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली. तर दुसरीकडे बीड बंदची हाक मराठा संघटनांकडून देण्यात आली आहे.