प्रतिनिधी | मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
मुंबईचा विकास रोखणारे महाराष्ट्रद्रोही आहेत. मराठी माणसाच्या मनात भय असेपर्यंत तो आपल्याच पाठीशी उभा राहील, असे काही जणांना वाटत असल्याने केंद्र सरकारच्या औद्योगिक विकास आराखड्याला विरोध करण्यात येत आहे. पण मुंबईची घोडदौड कुणीही थांबवू शकत नाही आणि कुणाचाही बाप आला, तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्राच्या विकास आराखड्यात पुणे, पिंपरी- चिंचवडचा समावेश झाला पाहिजे.
Related News
आमची संस्कृती दिवे लावण्याची, दिवे बंद करण्याची नाही: राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली टीका
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी जालन्याच्या तिघांविरोधात गुन्हा: पोलिस भरती घोटाळ्यातील रॅकेटचाच हात असल्याचे उघड
घोडेस्वारीत 41 वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्ण: मुलीला जर्मनीत प्रशिक्षण देण्यासाठी वडिलांनी घर विकले, खेळाडूंची प्रेरणादायी कथा
दुसऱ्या विवाहाचे फोटो पतीने स्टेटसला ठेवल्याने आत्महत्या: पतीने दुसरा विवाह केल्यामुळे डाॅक्टर पत्नीने घेतला गळफास
नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश डीजेवाजवणाऱ्या २२ गणेश मंडळांवर गुन्हे: डेसिबलची अट मोडणाऱ्यांवर पोलिस कारवाई
मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्हे, तर कायदेशीर लढ्याची गरज: पुण्यातील मराठा आरक्षणाबाबत तज्ज्ञांच्या बैठकीतील सूर
संत दामाजी कारखान्याची वार्षिक सभा: २०० कोटी रुपयांचा बोजा असताना आम्ही काटकसरीने चालवला- चेअरमन शिवानंद पाटील
सेलिब्रिटींचा गणेश: गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे निखळ आनंद- पं. विजय घाटे, तबलावादक आणि गुरू
प्रेमविवाह करायचाय, मग आई- वडिलांची परवानगी आवश्यक: गोंदियातील नानव्हा ग्रामपंचायतीचा ठराव, राइट टू लव्ह संघटनेचा आक्षेप
आलमट्टीच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली हेबाल नाला पाहणी: आलमट्टी धरणातील पाणी उपयोगात आणण्याचे प्रयत्न
19वी आशियाई स्पर्धा हांगझोऊ: आशियाईच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरा व आधुनिकतेचा मेळ, स्पर्धेत ज्योत पेटवण्यासाठी होलोग्रामचा वापर
अजेय इंदुरात दुसरा वनडे: आज जिंकलो तर मालिका विजय आपलाच; सूर्या व चौथ्या क्रमांकाचा गुंता सुटला; अश्विन-श्रेयसला करावे लागेल सिद्ध
महायुतीच्या वरळी क्रीडा केंद्रात झालेल्या मेळाव्यात फडणवीस म्हणाले की, केंद्राच्या मदतीने दीड लाख कोटी रुपये उभारून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे. नीती आयोगाने मुंबईचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्याची सूचना केली असून त्यावरून विरोधकांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला. त्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, प्रत्येक शहराचा केवळ विकास आराखडा तयार करून उपयोग नसून आर्थिक व गुंतवणुकीचाही आराखडा तयार केला पाहिजे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने 20 शहरे निवडली आहेत. उत्पन्नामध्ये मुंबईमहानगर क्षेत्राचा वाटा सहा टक्के असून तो 20 टक्क्यांवर न्यायचा आहे. त्याबाबत चार महिन्यांत आराखडा तयार करण्यात येणार असून नीती आयोग व केंद्र सरकार मदत करणार आहे. मुंबईचा विकास होत असल्याने जनतेचा बुद्धिभेद केला जात आहे, असे ते म्हणाले.
जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न असल्याची ओरड ही जनतेची दिशाभूल आहे. हा आरोप खरा असेल, तर वाराणसी उत्तर प्रदेशपासून, सुरत गुजरातपासून आणि विशाखापट्टणम आंध्रप्रदेशपासून तोडायचे आहे का? उलट पुढील काळात पुणे, पिंपरी-चिंचवडचीही निवड करावी, अशी विनंती मी केली आहे. युतीत कोणत्याही पक्षाच्या ध्येय धोरणांशी तडजोड होणार नाही. पण कार्यकर्त्यांनी सहकारी पक्षांच्या नेत्यांबद्दल टीकाटिप्पणी टाळावी.