खुलताबादएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
- २४.५० दलघमी क्षमतेच्या धरणात आता ९.०९ दलघमी साठा
खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव प्रकल्पात केवळ २७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांनी खुलताबाद नगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचा सूक्ष्म नियोजनाचा स्वयंस्पष्ट अहवाल मागवला आहे.
Related News
आमची संस्कृती दिवे लावण्याची, दिवे बंद करण्याची नाही: राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली टीका
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी जालन्याच्या तिघांविरोधात गुन्हा: पोलिस भरती घोटाळ्यातील रॅकेटचाच हात असल्याचे उघड
घोडेस्वारीत 41 वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्ण: मुलीला जर्मनीत प्रशिक्षण देण्यासाठी वडिलांनी घर विकले, खेळाडूंची प्रेरणादायी कथा
दुसऱ्या विवाहाचे फोटो पतीने स्टेटसला ठेवल्याने आत्महत्या: पतीने दुसरा विवाह केल्यामुळे डाॅक्टर पत्नीने घेतला गळफास
नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश डीजेवाजवणाऱ्या २२ गणेश मंडळांवर गुन्हे: डेसिबलची अट मोडणाऱ्यांवर पोलिस कारवाई
मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्हे, तर कायदेशीर लढ्याची गरज: पुण्यातील मराठा आरक्षणाबाबत तज्ज्ञांच्या बैठकीतील सूर
संत दामाजी कारखान्याची वार्षिक सभा: २०० कोटी रुपयांचा बोजा असताना आम्ही काटकसरीने चालवला- चेअरमन शिवानंद पाटील
सेलिब्रिटींचा गणेश: गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे निखळ आनंद- पं. विजय घाटे, तबलावादक आणि गुरू
प्रेमविवाह करायचाय, मग आई- वडिलांची परवानगी आवश्यक: गोंदियातील नानव्हा ग्रामपंचायतीचा ठराव, राइट टू लव्ह संघटनेचा आक्षेप
आलमट्टीच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली हेबाल नाला पाहणी: आलमट्टी धरणातील पाणी उपयोगात आणण्याचे प्रयत्न
19वी आशियाई स्पर्धा हांगझोऊ: आशियाईच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरा व आधुनिकतेचा मेळ, स्पर्धेत ज्योत पेटवण्यासाठी होलोग्रामचा वापर
अजेय इंदुरात दुसरा वनडे: आज जिंकलो तर मालिका विजय आपलाच; सूर्या व चौथ्या क्रमांकाचा गुंता सुटला; अश्विन-श्रेयसला करावे लागेल सिद्ध
पावसाळ्याचे तीन महिने उलटले, तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील येसगाव मध्यम प्रकल्प, गंदेश्वर प्रकल्पासह छोटे-मोठे तलाव व पाझर तलाव आणि विहिरी तळ गाठत आहेत.
२०११ जनगणनेनुसार खुलताबाद शहराची लोकसंख्या १५ हजार ७४९ असली तरी आजघडीला शहराची लोकसंख्या २० हजारांहून अधिक आहे. शहरात २६०० पेक्षा जास्त नळ कनेक्शन असून शहरात जवळपास १२ लाख लिटर पिण्याचे पाणी दुसऱ्या व तिसऱ्या दिवसी सोडले जात आहे. उरुसात लागणार लाखो लिटर पाणी : खुलताबाद येथे याच महिन्यात मोठा उरूस सुरू होत आहे. त्यामुळे याचेही प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.
येसगाव धरणात असलेल्या विहिरींमध्ये साचलाय गाळ
खुलताबाद नगरपालिकेने येसगाव धरणात खोदलेल्या पाणीपुरवठ्याच्या पाच विहिरींनी २०१८-१९ च्या दुष्काळी परिस्थितीत शहरवासीयांची तहान भागवली होती. २०२०-२१ मध्ये धरण १०० टक्के भरले होते. आता या विहिरीत गाळ साचला आहे. विहिरी उघड्या झाल्यावर गाळ उपसा करावा लागणार आहे.
२०१८-१९ मध्ये टँकरने पाणीपुरवठा
२०१८-१९ साली दुष्काळी परिस्थितीमुळे खुलताबाद शहराला टँकरने पाणीपुरवठा केला होता. छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वेरूळ व शूलिभंजचे खाकसार तलावातून टँकरने पाणीपुरवठा केला होता.
गंदेश्वर प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याला गळती
राज्य शासनाने पाणीपुरवठा योजना मंजूर करून गंदेश्वर प्रकल्पाचे पाणी येसगाव धरणात आणले होते. १० कोटींच्या वर खर्च करून गंदेश्वर प्रकल्पात नवीन विहीर व गंदेश्वर ते येसगाव प्रकल्पापर्यंत पाइपलाइन असे काम पूर्ण करून शहराची पाण्याची समस्या मिटवली होती, परंतु आज रोजी गंदेश्वर-येसगाव पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागली आहे.