नागपूर31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक ज्येष्ठ नेते होते. त्यांना शरद पवारांनी खूप काही दिले. पण आता तेच आपल्या 83 वर्षीय बापाला त्रास देत आहेत, अशी तिखट टीका राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे बोलताना केली.
Related News
कोणत्या नैतिकतेने राष्ट्रकुल संसदीय परिषदेला राहुल नार्वेकर उपस्थित राहणार? आदित्य ठाकरेंची टीक
गणेश विसर्जनावेळी झारखंडच्या टोळीपासून सावधान! 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त
अजित पवार IN पडळकर OUT: देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यात अजितदादा एका गेटने आत, पडळकर दुसऱ्या गेटने बाहेर
मुख्यमंत्रिपदावरुन मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार, नंतर ट्वीट केलं डिलीट
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ‘रिंग रोड’ तयार, कसा असेल? जाणून घ्या
डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष निवडीबाबत सुनील तटकरेंची महत्त्वाची माहिती
अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे, लालबागच्या राजाच्या चरणी चिठ्ठी अर्पण
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची वर्णी?
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरलं; ‘हे’ दिवस महत्त्वाचे!
‘लोकांचं रक्तही तुम्हाला कमी पडले’; संतोष बांगरांची ठाकरे गटाच्या खासदारावर खोचक टीका
‘पत्रकारांना चहा प्यायला न्यायला पहिजे म्हणजे…’; त्या’ वादग्रस्त विधानावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण!
प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते होते. पवार साहेबांनी त्यांना खूप काही दिले. आता ते भाजपा आणि नरेन्द्र मोदी यांचे गुणगान गात आहेत. ज्या शरद पवारांनी पटेलांना मोठे केले, पक्षात अनेक पदे आणि अधिकार दिले. अशा 83 वर्षाच्या बापाला त्रास देत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.
28 पक्षांचे लोकांनी 2 दिवस मुंबईत चर्चा करुन अनेक निर्णय घेतले. त्या बैठकीत अनेक समित्यांची स्थापना झाली. हे पचनी पडत नाही म्हणून प्रफुल्ल पटेल इंडिया आघाडीवर टीका करीत आहे. पटेलांनी स्वतःची भूमिका बदलली. म्हणूण हे 28 पक्ष एकत्र आल्याचा त्यांनी धसका घेतला आहे. यामुळेच ते अशा प्रतिक्रिया देत असतात, असे अनिल देशमुख म्हणाले.
गृह मंत्रालयावर टीकेची झोड
जालन्यात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार दुर्दैवी आहे. गृह मंत्रालयाने आदेश दिला म्हणून हा लाठीचार्ज झाला, असा आरोप देशमुख यांनी केला. मराठा समाज एकत्र येत आहे हे पाहून पोलिस अधीक्षकांना बळीचा बकरा बनवत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. निवृत्त न्यायाधीशांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी. त्यानंतर माझ्या बोलण्यात किती तथ्य आहे हे समोर येईल, असेही देशमुख यावेळी म्हणाले.
गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय लाठीमार शक्य नाही
मी स्वतः गृहमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे काही माहिती आम्हालाही मिळत असते. गृह मंत्रालयाकडून आदेश गेल्याशिवाय अशा कारवाया होत नाहीत, असेही अनिल देशमुख यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करताना म्हणाले.