Sharad Pawar Support Gautam Adani : गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. अदानींना धारावी गिळू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यात दिला होता. मात्र, आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. येत्या दोन तीन दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन त्यांच्या मनातली शंका समजून घेणार असल्याचं विधान शरद पवारांनी केले आहे.
शरद पवार गौतम अदानी यांच्या मदतीला आले धावून
पवार आणि अदानी मैत्रीचं नातं सगळ्यांच्या परिचयाचं आहे. अदानी आणि पवारांचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते. अशात उद्धव ठाकरेंनी धारावी गिळू देणार नसल्याची रोखठोक भूमिका घेतली.मात्र पवारांनी त्यावर घेतलेल्या भूमिकेनं पवार पुन्हा अदानींच्या मदतीला धावल्याचं बोललं जातंय.
गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन
गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार पाहायला मिळाले. गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या उदघाटनाचा फोटो शरद पवारांनी ट्विट केलाय. गुजरातमध्ये गौतम अदानींनी नवा पॉवरप्लँट सुरू केलाय. याच पॉवरप्लांटचं उदघाटन पवारांनी केलंय.
Related News
मलिक अल्पसंख्यांक म्हणून ही भूमिका घेतली का? सुषमा अंधारेंचा सवाल
संजय राऊतांचा बळीचा बकरा पक्षश्रेष्ठींनीच केलाय; निलम गोऱ्हेंची नाव न घेता ठाकरेंवर सडकून टीका
धर्माच्या नावानं मतं मागायची? ठाकरेंच्या पत्राला निवडणूक आयोगाचं उत्तर नाही, पुन्हा स्मरणपत्र
‘अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..’; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला
Blog : नवाब मलिकांवरुन महायुतीत महाभारत?
हल्ला फक्त मलिक यांच्यावर बाकीचे यांच्या मांडीवर! संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
नवाब मलिक कोणाचे? फडणवीसांच्या पत्रानंतर सुनिल तटकरेंची सूचक प्रतिक्रिया
फडणवीसांनी पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती, अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं?
फडणवीस पत्र न लिहिता अजित पवारांना फोन करुनही सांगू शकत होते,सुप्रिया सुळे थेटच म्हणाल्या
फडणवीसांच्या पुढाकाराने सरकार आणलं,त्यांची भूमिका हीच सरकारची भूमिका दरेकरांची प्रतिक्रया
अजितदादांना सत्तेत घेताना देश मोठा वाटला नाही का?, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना बोचरा सवाल
देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये, तरीही मंत्रीपद कायम; मलीकांच्या समोरच फडणवीस थेट बोलले
धारावीचा पुनर्विकास अदानी समूह करणार
आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास अखेर अदानी समूह करणार आहे. राज्य सरकारने धारावीच्या पुनर्विकासाठी अंतिम मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तेव्हा धारावीच्या साडे सहा लाख झोपडीधारकांचं आता येत्या 7 वर्षात पुनर्वसन करण्यात येणार आहे.. यासाठी 20 हजार कोटींची बोली अदानी समूहाने लावली होती.
मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा
मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. जिथं प्रशासक आहेत, तिथं घोटाळे सुरू आहेत, असं ते म्हणाले. एका कंत्राटदाराला टर्मिनेशनची नोटीस देण्यात आलीय. त्याच्यावर कारवाई होणार की खोके घेऊन कारवाई थांबवणार, असा सवाल ठाकरेंनी केला. मोठा गाजावाजा करून नारळ फोडला. मात्र, मुंबईतील तब्बल २५०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे अजूनही सुरूच झालेली नाहीत, असं ते म्हणाले.