बुमराह की शाहीन आफ्रिदी? सर्वोत्तम गोलंदाज कोण? वसीम अक्रमने एका वाक्यात विषयच संपवला

वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आला तेव्हा सर्वांच्या नजरा पाकिस्तानी गोलंदाजांकडे होत्या. हा सामना खरं तर भारताचे आक्रमक फलंदाज आणि पाकिस्तानचे भेदक गोलंदाज यांच्यात होता. पण पाकिस्तानचे गोलंदाज फक्त भारतच नाही, तर संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेतच अपयशी ठरले आहेत. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाज अनपेक्षित कामगिरी करत आहेत. याशिवाय जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी गोलंदाजांची तुलना केली जाते तेव्हा जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांचा उल्लेख केला जातो. वर्ल्डकपच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोघांची चर्चा असून वसीम अक्रमने याचं उत्तर दिलं आहे. वसीम अक्रमने तोंडभरुन भारतीय गोलंदाजाचं कौतुक केलं आहे. 

वर्ल्डकपआधी जखमी असल्याने जसप्रीत बुमराह तब्बल वर्षभर मैदानापासून दूर होता. पण संघात पुनरागमन केल्यापासून बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमधील प्रत्येक सामन्यात त्याने आपली छाप सोडली आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर वसीम अक्रम फिदा झाला असून, जगातील सर्वोत्तम गोलंदाज असं कौतुक केलं आहे. जसप्रीत बुमराहची तुलना अनेकदा शाहीन आफ्रिदीशी केली जात असून, वसीम अक्रमने आपल्या उत्तराने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

“बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. तो पहिल्या क्रमांकावर आहे. नियंत्रण, वेग, बदल…तो एक सर्वगुणी गोलंदाज आहे. त्याला पाहणं म्हणजे पर्वणी आहे. चेंडू नवा असतानाही अशा मैदानावर अशी गोलंदाजी करणं म्हणजे जबरदस्त आहे. तो एक संपूर्ण गोलंदाज आहे,” असं वसीम अक्रमने सांगितलं.

Related News

तसंच वसीम अक्रमने जेव्हा नवा चेंडू हाताळण्याची वेळ येते तेव्हाही बुमराहच चांगला गोलंदाज आहे असा दावा केला आहे. “जेव्हा बुमराह डाव्या हाताच्या फलंदाजाला अराऊंट दे विकेट चेंडू टाकतो आणि सीमवर चेंडू मारतो… आणि जेव्हा तो क्रीजच्या वाइडवरून गोलंदाजी करतो तेव्हा फलंदाजाला वाटतं की चेंडू आत येत आहे. पण चेंडू खेळपट्टीवर आदळतो आणि आत येण्याऐवजी दूर जातो. बर्‍याच वेळा, तुम्हाला तो चेंडू कळत नाही. जेव्हा मी उजव्या हाताच्या फलंदाजांना नवीन चेंडूने असे आउटस्विंगर्स टाकायचो, तेव्हा कधी-कधी मला ते जमत नव्हते. चेंडूवरही नियंत्रण ठेवा. पण बुमराहकडे माझ्यापेक्षा नवीन चेंडूवर नक्कीच चांगले नियंत्रण आहे,” असं बुमराहने सांगितलं. 

वसीम अक्रमने यावेळी उपहासात्मकपणे म्हटलं की, बुमराहला रोखायचं असेल तर विरोधी संघाला त्याचे स्पाइक्स चोरावे लागतील. “बुमराह ज्या लांबीने चेंडू टाकतो, त्यामुळे फलंदाजासाठी अनिश्चितता निर्माण होते. त्याच्यावर दबाव टाकायचा असेल तर त्याचे स्पाईक्स चोरी करा. हाच एकमेव मार्ग आहे,” असं तो म्हणाला. 

“पाकिस्तानी गोलंदाजांपेक्षा बुमराह अधिक घातक का आहे, कारण तो अधिक कसोटी क्रिकेट खेळतो, तर आमचे गोलंदाज ते मोठ्या लांब फॉरमॅटमध्ये खेळत नाहीत,” असं अक्रमने स्पष्ट केलं.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *