भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने जर गरज भासली तर वर्ल्डकपमध्ये आम्ही तीन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो असं सांगितलं आहे. भारतीय संघ आज श्रीलंकेशी भिडणार असून, मुंबईतील वानखेडे मैदानात हा सामना होणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावळी त्याने हार्दिक पांड्याच्या दुखापतीवरही भाष्य केलं. बांगलादेशविरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्यावर उपचार सुरु असून, सध्या संघाबाहेर आहे. दरम्यान हार्दिक पांड्या संघात नसल्याने संघाचा समतोल राखणं अवघड जात असल्याची चर्चा आहे. पण रोहित शर्माने उद्या हार्दिक पांड्या उर्वरित सामन्यांसाठी फिट झाला तरी संघ इतर प्रयोग करुन पाहिल असं सांगितलं आहे.
“आम्ही सर्व प्रकारचे प्रयोग करुन पाहू शकतो. आम्ही तीन फिरकी आणि दोन जलदगती गोलंदाजांसहदेखील खेळू शकतो. या स्पर्धेत फिरकी गोलंदाज मधील ओव्हर्समध्ये खऱ्या अर्थाने धावा रोखत आहेत. हार्दिक पांड्या संघात असला किंवा नसला तरी आम्ही सर्व पर्याय खुले ठेवत आहोत. उद्या जर परिस्थितीची मागणी असेल तर आम्ही तीन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. ते मधील ओव्हर्समध्ये धावांची गती रोखू शकतात. आमच्या फिरकी गोलंदाजांकडे अशा स्थितीत खेळण्याचं कौशल्य आहे,” असं रोहित शर्माने सांगितलं आहे.
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने वर्ल्डकपमधील पराभवानंतर खेळाडूंची नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजयरथ रोखला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. अंतिम सामन्यातील पराभवापूर्वी भारताने सर्व 10 सामने...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णामाचारी श्रीकांत यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल भाष्य केलं आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतल्याने जसप्रीत बुमराह दुखावला गेला असेल असं मत श्रीकांत यांनी...
गोलंदाजांवर आणि खासकरुन फिरकी गोलंदाजांवर किती भार आहे यासंबंधी बोलताना रोहितने ते फार चांगल्या स्थितीत असल्याचं सांगितलं. “गोलंदाजांना विश्रांती देण्याचा प्रश्न असेल तर ते सध्या चांगल्या लयीत आहेत. त्यांना आरामाची गरज नाही. त्यांचं शरीर थकलेलं नाही. सामने खेळत असल्याचा मला आनंद आहे,” असं रोहित शर्माने म्हटलं.
हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर बोलताना सांगितलं की, “दुखापतीनंतर सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. श्रीलंकेविरोधात सामन्यात तो खेळणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करत आहोत. तो लवकरात लवकर खेळू शकतो”.
मुंबईतील प्रदूषणावर बोलताना रोहित शर्माने मी नेहमीच आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करत असतो असं सांगितलं. तसंच संबंधित विभाग याची काळजी घेत असेल अशी आशाही व्यक्त केली. रोहित शर्माने मुंबईत येताना विमानातील एक फोटो शेअर करत प्रदूषणावर चिंता व्यक्त केली होती.
हार्दिक पांड्या थेट सेमी-फायनलमध्ये खेळणार?
हार्दिक पांड्या अद्यापही जखमी असल्याने श्रीलंका आणि 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या सामन्यातही तो खेळणार नाही. 12 नोव्हेंबरला भारतीय संघ लीममधील शेवटचा सामना नेदरलँडविरोधात खेळणार आहे. हार्दिक पांड्या या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. बंगळुरुत हा सामना होणार आहे.
“ही किरकोळ जखम आहे. तो दुखापतीमधून सावरत असून, लीगच्या अखेरच्या सामन्यात पुनरागन करु शकतो. किंवा तो बहुतेक थेट सेमी-फायनल सामनाही खेळू शकतो,” अशी बीसीसीआय सूत्रांची माहिती आहे.
तू रेकॉर्डचा विचार करत नाहीस का?
“वर्ल्डकपमध्ये तू निस्वार्थ भावनेने फलंदाजी करत आहे, त्याचं कौतुक होत आहे. तू कोणताही रेकॉर्ड करण्यापेक्षा चांगली खेळी करण्याकडे लक्ष देत आहेस. पॉवरप्लेमध्ये तू सर्वाधिक धावा केल्या आहेस. काही माजी खेळाडूंना संघासाठी स्वार्थी झालात तर बरं होईल असा सल्लाही दिला आहे,” असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. त्यावर रोहित म्हणाला की, “मी सुरुवातीला फलंदाजीला जात असल्याने विचार करुन खेळावं लागतं. याचं कारण माझ्या खेळीने संपूर्ण चित्र तयार होत असतं. त्यामुळे माझ्याकडे चांगली संधी किंवा फायदा असतो असं तुम्ही म्हणू शकता. कारण माझ्यावर विकेट गेल्याचा काही दबाव नसतो. त्यामुळे जेव्हा 0-0 अशी स्थिती असते तेव्हा तुम्ही न घाबरता आणि जसं हवं तसं खेळू शकता,” असं रोहित शर्माने सांगितलं.
“जर तीन विकेट गमावल्या असतील तर एक फलंदाज म्हणून तुम्हाला संघासाठी जे योग्य आहे ते करावं लागतं. पहिल्या ओव्हरमध्ये काय गरज आहे, पाचव्यात काय आणि दहाव्या ओव्हरमध्ये काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. संघाची धावसंख्या किती आहे, किती धावांचा पाठलाग करत आहोत, या मैदानावर किती धावसंख्या उभारणं गरजेचं आहे? या सगळ्याचा विचार केला जातो. त्यामुळे त्यावेळी जशी गरज असते त्यानुसार मी खेळत असतो,” असं रोहित शर्मा म्हणाला/
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने वर्ल्डकपमधील पराभवानंतर खेळाडूंची नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजयरथ रोखला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. अंतिम सामन्यातील पराभवापूर्वी भारताने सर्व 10 सामने...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णामाचारी श्रीकांत यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल भाष्य केलं आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतल्याने जसप्रीत बुमराह दुखावला गेला असेल असं मत श्रीकांत यांनी...